राहाता (जि. अहिल्यानगर ) : सोनू भैय्या खिरे हे वन्यजीव रक्षणासाठी राहाता तालुक्यात ओळखले जातात. एक सर्पमित्र आणि पर्यावरणप्रेमी असलेले खिरे, गरीब परिस्थितीमध्ये वाढले असले तरी त्यांची समर्पणभावना आणि निसर्गाशी असलेली नाळ आज सर्वांपर्यंत पोहोचली आहे. त्यांचं मुख्य कार्य म्हणजे साप व इतर वन्य प्राण्यांची रेस्क्यू करणे आणि त्याबद्दल समाजात योग्य माहिती पोहोचवणे.

वन्य प्राण्यांबाबत असलेल्या गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी खिरे हे नेहमीच सक्रिय असतात. “साप हा आपल्यासाठी धोकादायक नाही, तर तो निसर्गाचं महत्त्वपूर्ण घटक आहे,” असं ते नेहमी सांगतात. समाजात असलेल्या अंधश्रद्धांना ताव देत, ते लोकांना समजावतात की साप किंवा इतर वन्य प्राण्यांशी योग्य वागणूक ठेवली पाहिजे.
कधी कधी, घराजवळ किंवा परिसरात साप किंवा इतर वन्य प्राणी आढळल्यास, खिरे यांचा स्पष्ट सल्ला आहे की, “विना अनुभव असलेल्या व्यक्तींनी कधीही वन्य प्राणी पकडण्याचा किंवा रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे आपली आणि प्राण्यांची जीवनं धोक्यात येऊ शकतात.” अशा परिस्थितीत तज्ज्ञांची मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे.
“एक फोन कॉल, एक जीव वाचवू शकतो” असा संदेश खिरे प्रक्षिप्त करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, वन्य प्राण्यांना सुरक्षितपणे पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक वासस्थानात परत सोडणं हेच योग्य आहे.
सोनू भैय्या खिरे हे केवळ साप व वन्य प्राणी बचाव कार्यातच सक्रिय नाहीत, तर ते समाजातील प्रत्येक व्यक्तीला निसर्गाच्या महत्त्वाबद्दल जागरूक करण्यासाठी विविध उपक्रम राबवतात. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायक ठरले आहे.
“भूतदया हीच ईश्वर सेवा” या संत तुकाराम महाराजांच्या वचनांचा आदर्श घेत खिरे हे वन्य प्राणी संरक्षण कार्य करत आहेत आणि त्यांनी ठरवले आहे की, हे कार्य ते निरंतर करत राहतील.
संपर्क:
संदीप प्रकाश खिरे
वन्यजीव रक्षक आणि सर्पमित्र
मोबाईल: 96 89 68 45 42
निमगाव निघोज, ता. राहाता, जि. अहिल्यानगर
निसर्ग रक्षणाय सर्व सजीव हिताय!
राष्ट्रनामा तर्फे त्यांच्या कार्याला सलाम व पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
